वसई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून, एका ठिकाणी चारचाकी गाडी पाण्यात अडकली आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.काही वाहनं मधेच बंद पडल्याचे देखील समोर येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, पाणी निचऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत.