समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात एक विधान केलंय.वारीमुळे रस्त्यावर गर्दी होते, त्यावेळी मुस्लीम समाज तक्रार करत नाही.पण मुस्लिमांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते, असं आबू आझमी म्हणालेत.त्यांच्या या विधानानंतर जोरदार टीका होतीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आझमींवर सडकून टीका केलीय. मी आझमींना प्रत्युत्तर देण्याच्या लायकीचं समजत नाही, ते प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करतात असं फडणवीसांनी म्हटलंय.