एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली तेव्हा संजय राऊतांनाही गुवाहाटीला यायचं होतं असा खळबळजनक दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. शिवाय शिंदेंच्या आधीही संजय राऊत फुटणार होते असंही गुलाबराव पाटील म्हणाले. शिवाय शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्तावही संजय राऊतांनी दिल्याचं पाटील यांनी सांगिंतलं. सोबत असलेल्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केल्यामुळे ते येऊ शकले नाही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. आता गुलाबराव पाटील यांच्या दाव्यावर संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.