आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवले जाते आहे. तब्बल साडेचार ते पाच हजार अधिकारी , कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरात 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झाले आहे. निर्मल वारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठेवले आहे. यातूनच पंढरपुरात महास्वच्छता होती आहे याच पंढरपूर स्वच्छतेचा बाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...