वाशिममध्ये रेशनच्या हजारो क्विंटल गव्हाची नासाडी झाली. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हजारो क्विंटल गहू पावसामुळे भिजून गेलाय. गहू धान्य गोदामावर सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही कंत्राटदारांची असते. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच हा गहू मातीमोल झाला. त्यामुळे आता या गव्हाची नुकसान भरपाई कोण करणार? हा प्रश्न निर्माण झालाय.