जाहिरात
Story ProgressBack

'CAA NRC कायद्यात भाजपाकडून हिंदूंची फसवणूक', जाहीरानामा प्रसिद्ध करताना आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar : CAA, NRC आणि समान नागरी कायदा या मुद्यावर आंबेडकर यांनी सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं

Read Time: 2 min
'CAA NRC कायद्यात भाजपाकडून हिंदूंची फसवणूक', जाहीरानामा प्रसिद्ध करताना आंबेडकरांचा आरोप
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा आज (सोमवार) प्रसिद्ध झाला.
अकोला:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन विकास आघाडीनं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. CAA, NRC आणि समान नागरी कायदा या मुद्यावर आंबेडकर यांनी सत्तारुढ भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. भाजपा हिंदू मतदारांनाच फसवत असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. 

जाहिरनाम्यात काय?

NRC आणि CAA हे कायदे पूर्णपणे असंवैधानिक आहेत, हे कायदे मुस्लिमांच्या हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे दाखवले जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळातील पेंढारी ज्यांना आता VJNT म्हंटले जाते, त्यांना बसेल. 20 टक्के हिंदू समाजाच्या विरोधात हे कायदे आहेत, असा दावा आंबेडकर यांनी केला.  

समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही पण हा आरएसएसला धोका आहे. धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या भाजपा, RSS, बजरंग दल यांना या कायद्याचा धोका आहे, असा टोलाही आंबेडकर यांनी यावेळी लगावला. 

कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असेही जाहिरनाम्यात स्पष्ट करण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

काँग्रेसचा जाहीरनामा आला... हुकमाचा एक्का टाकला, 'ही' आहेत 5 प्रमुख वैशिष्ट्य
 

केंद्रात शिक्षणावर फक्त 3 टक्के तरतूद आहे, राज्यात 5 टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला 9 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन, आंबेडकर यांनी दिलं आहे. 

'3 कोटी नवीन घरे, ट्रान्सजेंडर्सनाही आयुष्मान योजनेत आणले जाईल', BJPच्या जाहिरनाम्यातील मोठ्या गोष्टी
 

सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत,  ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान 9 हजार आणि सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.  आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहोत, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination