पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी तीन नवीन महानगरपालिका स्थापन कराव्या लागतील, असे एक मोठे विधान केले आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे या भागातील समस्या वाढत आहेत.