ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळतोय.ईशान्य भारतात भूस्खलन आणि पुरामुळे 30 जणांचा मृत्यू झालाय.आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराममध्येही पावसाने कहर केलाय.आसाम ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये सुमारे 60 हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.अरुणाचल प्रदेशात अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनात दोन कुटुंबातील सात जणांसह नऊ जणांचा मृत्यू झाला.हवामान खात्याने आसामच्या काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर ईशान्येकडील उर्वरित भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.