बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा फुटल्याने हजारो लीटर पाणी रस्त्यावर आलंय.त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय.बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा फुटला असून शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालंय.काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.