मुलीचं लग्न हा आई बापासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. जबाबदारी पूर्ण करण्याची जाणीव असते. पोरीच्या आयुष्याची नवी सुरुवात करून दिल्याचं ते एक मोठं समाधान असतं. पण हे साधं सुख सध्या प्रचंड महाग झालंय इतकं महाग की प्रसंगी ते जीवावर उठतंय. लग्नाच्या या सोहळ्याचा बाजार झालाय असा बाजार की ज्यामध्ये लाखो करोडोंची उधळण होतीये पण ना त्यातून सुखी आयुष्याची खात्री मिळतीये ना मनाला समाधान मिळतंय. वैष्णवीच्या मृत्यूनं हेच वास्तव फक्त पुन्हा एकदा ढळढळीतपणे समोर आणलंय