गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला. यंदा राज्यभरात कांद्याची तीस टक्के अधिक लागवड झाली होती. मात्र कांद्याच्या ऐन काढणीच्या वेळीच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.