भाजपकडून 22 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात.अंतर्गत मतभेद, स्थानिक वाद मिटवल्यानंतर भाजपनं ही नावं जाहीर केलीत.नेते, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून करण्यात येतोय. 2 आठवड्यापुर्वीही 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती भाजपकडून करण्यात आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, यादृष्टीने सर्व संबंधितांशी प्रदेश पातळीवरून समन्वय साधण्यात येत आहे.काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांमुळे पक्षात नाराजीची भावना निर्माण झाली आहे.