पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला.यानंतर आता सीडीएस जनरल अनिल चौहान यांचं एक विधान चर्चेत आलंय. सुरूवातीला भारताचं नुकसान झालं असं अनिल चौहान म्हणाले. पण याबद्दलचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाच्या पहिल्या दिवशी नुकसान झाल्यानंतर भारताने आपली रणनीती बदलली आणि तीन दिवसांनंतर दोन्ही देशांनी शस्त्रविराम जाहीर करण्यापूर्वी भारताने निर्णायक आघाडी मिळवली,असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलंय..