उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती,असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला होता.बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्त्ववादाचे एकमेव नेते होते. मात्र उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा मोह झाला आणि शिवसेना फुटली असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय.एकनाथ शिंदे त्यावेळी जुनिअर होते, मित्रपक्षातील नेते त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते असं उत्तर संजय राऊतांनी दिलंय.