राज्यात उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४0 पर्यंत पोहोचू शकतात.नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे नाशिक आणि आसपासच्या लोकांनी कृपया लक्ष ठेवा, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईचा पारा ३५ वर असला तरी हवामान उष्ण आणि दमटच राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायम असणार आहे.