लग्नाचा खर्च टाळण्यासाठी मराठा समाजाने आचारसंहिता ठरवली.लग्नातील लाखो रूपयांच्या खर्चावर आचारसंहिता ठरवण्यात आली.अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून हा ठराव झालाय.मराठा समाजात हुंडा, प्रिवेंडिंग, डीजे, जेवणावळी, मानपान यावर लाखो रुपये खर्च होतात.हुंडाबळीसारख्या घटनाही घडत आहेत.हा खर्च टाळण्यासाठी आचारसंहिता ठरवत समाजात जनजागृती करण्याचा निर्णय येथे मराठा समाजाने बैठकीत घेतला आहे.मराठा समाजाच्या लग्नसमारंभात वर-वधूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. यावरही आक्षेप घेण्यात आला.