मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झालाय. आठवडाभरापूर्वीच मान्सूनचं अंदमान, निकोबार बेटांवर आगमन झालं होतं. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली होती. केरळमध्ये देखील मान्सून वेळे आधीच दाखल झाला होता, त्यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.