महाराष्ट्रात हुंड्यासाठी रोज किमान 32 महिलांचा छळ होत असल्याची आकडेवारी NDTVमराठीने संकलित केलेल्या माहितीतून समोर आली.वैष्णवीच्या आत्महत्येनंतर या गंभीर गोष्टी समोर आल्यात.राज्यात साडेतीन वर्षात महिला छळाचे 40 हजार गुन्हे दाखल झालेत.सासरच्या मंडळींविरोधात हजारो गुन्हे दरवर्षी दाखल केले जातात.त्यातील अनेक तक्रारी दाखलही होत नसल्याचं समोर आलंय.2022-25 वर्षात छळाच्या सर्वाधिक तक्रारी समोर आल्यात. महिलांच्या छळात मुंबई आघाडीवर असल्याचंही आकडेवारीतून समोर आलंय.