कोलकाता पोलिसांनी पुण्यातील विद्यार्थिनीला वॉरंटशिवाय अटक केल्याचा आरोप करण्यात येतोय.कोलकाता पोलिसांनी पुण्यातील 19 वर्षीय विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोलीला दिल्लीतून वॉरंटशिवाय अटक केल्याचा आरोप आहे.शर्मिष्ठाने एका वादग्रस्त व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादानंतर तो व्हिडिओ डिलीट करून सार्वजनिक माफी मागितली होती.तरीही, कोलकाता पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस न देता त्यांच्या घरी जाऊन अटक केली.दरम्यान, एमआयएम नेते वारीस पठाण यांनी तिच्या व्हिडिओवर आक्षेप घेत अटकेची मागणी केली होती.त्यामुळे आता वारिस पठाण यांच्या आक्षेपामुळे तिला वारंट न बजावता अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.