मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्या 5 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या जलद गाड्या 10 मिनिटांच्या विलंबाने.धीम्या गाड्याही 5 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.हार्बर लाईनवरही काही मिनिटांच्या विलंबाने रेल्वे सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, वेस्टर्न लाईनवर गाड्या 5 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.