गेल्या चार दिवसांपासून अचानक दडी मारलेल्या पावसाने रत्नागिरीत आज सकाळपासून दमदार हजेरी लावली. जवळपास 10 ते 15 मिनिटं शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली.रत्नागिरी जिल्ह्यात 8 ते 10 दिवस दमदारपणे कोसळणाऱ्या पावसाने गेले चार दिवस मात्र ब्रेक घेतला होता.पावसाने दडी मारल्यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण झाले होते.पण आज सकाळी मात्र पावसाची दमदार सर कोसळली आणि वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला.पावसाच्या या पुनरागमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.