संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे. ते जिथं जातील तिथं सगळं संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते. मात्र त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते. ते एकही आमदार पाडू शकले नाहीत असे पाटील म्हणाले.