10 नोव्हेंबरला झालेल्या दिल्ली स्फोटानं सारा देश हादरला. १३ जणांचा बळी घेणाऱ्या या स्फोटानंतर दहशतवादविरोधी कारवायांना अधिक वेग आला. अनेक धक्कादायक खुलासे ही तपासातून समोर येत आहेत, त्यामुळे देशाला किती घातक धोका या दहशतवाद्यांपासून होता हे ही उघड होतंय. मात्र जीवाची बाजी लावून या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरुच आहे. यावर आता बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यानं प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्यानं पहलगाम हल्ला आणि दिल्ली स्फोटातील पीडितांना श्रद्धांजलीही वाहिली.शिवाय सुरक्षा दलाच्या जाँबाज सैनिकाचं कौतुकही केलं. पाहूया शाहरूख खाननं नेमकं काय म्हटलंय.