देशात वाघांची शिकार रोखण्यासाठी आता व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डब्ल्यूसीसीबी ने शिकार रोखण्यासाठी संपूर्ण भारतामधील व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट जारी केलाय. वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ किंवा डब्ल्यूसीसीबी ही केंद्र सरकारची एक संस्था आहे. या संस्थेनं गेल्या आठवड्यात देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना रेड अलर्ट जारी केला.