लातूरमधील अहमदपूर तालुक्यातून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी 25 हजार भाकरींचा टेम्पो रवाना झाला आहे. आंदोलकांना उपाशी राहू नये म्हणून चटणी आणि पाण्याच्या बाटल्यांसह ही व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातून दररोज एक टेम्पो भाकरी मुंबईला पाठवण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. मराठा आंदोलकांकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.