निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेत.नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली होती..व्हिडीओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरविली जात असल्याची शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. या फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीने आयोगाने आपल्या नियमात बदल केले आहेत. निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग व व्हिडीओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या कालावधीत निवडणूक निकालाला कोणी न्यायालयात आव्हान दिले तर हे फुटेज अधिकाऱ्यांना नष्ट करता येणार नसल्याचे संबंधित निर्देश देताना आयोगाने स्पष्ट केले. या नियम बदलांवरुन काँग्रेसच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे