नाशिकमध्ये जेमतेम पावसाला सुरुवात होत नाही तोच शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून कुठे भले मोठे खड्डे पडले आहेत तर कुठे खडी, वाळू रस्त्यावर पसरलीय. नाखड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डयाच्या खोलीचाही अंदाज येत नसून यातून वाट काढतांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पहिल्याच पावसात ही परिस्थिती झाल्याने पुढच्या दोन ते तीन महिन्यात रस्त्यांची काय अवस्था होणार ? याची चिंता आता नाशिककरांना लागली आहे. दरम्यान रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात आल्याचा नाशिक महापालिकेचा दावा फोल ठरला असून पालिकेच्या कारभारावरही आता संशय व्यक्त केला जातोय..