Nashik| पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली, पाणी साचल्यानं द्राक्ष बागांना तळ्याचं स्वरूप

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधार पावसाने द्राक्षांची पंढरी निफाड तालुक्यात द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील गावात झालेल्या संततधार पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने द्राक्ष बागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.पावसाच्या पाण्याने द्राक्ष बागेच्या मुळ्या चोकप होण्याबरोबरच, द्राक्ष करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे,तर उत्पादनातही घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.पावसामुळे द्राक्ष बागांवर अतिरिक्त फवारणी करावी लागणार असल्याने द्राक्ष उत्पादकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.त्यामुळे झालेला खर्चही वसूल होईल की नाही याची चिंता द्राक्ष उत्पादकांना सतावत आहे.

संबंधित व्हिडीओ