धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री असताना राज्यात पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचं मान्य केलंय. हा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मांडला त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.