भारत आता राजकीय एकतेचं उदाहरण दाखवणार आहे. ऑपरेशन सिंदूरवर भारताची राजकीय एकता पाहायला मिळेल. भारतीय खासदारांचं शिष्टमंडळ जगभरामध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती देईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व पक्षांच्या खासदारांना विविध शिष्टमंडळांमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. प्रत्येक शिष्टमंडळामध्ये पाच ते सहा खासदार असतील. ते वेगवेगळ्या देशांना भेट देतील आणि पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्या नंतर पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांच्या विरुद्ध भारताच्या कारवाई संदर्भात सविस्तर माहिती देतील.