पाच दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. कांदा, आंबा, गहू, भाजीपाल्यासह फळबागांना याचा मोठा फटका बसतोय. विशेष म्हणजे वातावरणातील सततच्या या बदलांमुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता हत झालेला आहे.