पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सुप्रीम कोर्टात नव्यानं याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याचे वकील विशाल तिवारी यांना कोर्टाने चांगलं सुनावलंय. तुम्ही सतत याचिका दाखल करत राहता त्याचा उद्देश फक्त स्वतःची जाहिरात करणं असा दिसतोय असं सुप्रीम कोर्ट ने फटकारताना म्हटलेलं आहे. तुम्हाला इतका दंड ठोठावला पाहिजे की ते एक उदाहरण बनेल असं सुद्धा कोर्टाने या सगळ्या संदर्भात म्हटलंय