गडचिरोली जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातॊ य़ा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात माडिया गोंड ही जमात राहत असून या जमातीमध्ये आजही घरात एखादी व्यक्ती मृत झाला तर त्याला जमिनीमध्ये पुरून त्याचा आठवणीत एक मोठे दगड ठेवल्या जाते आणि त्या दगडाची नीती नियमाने पूजा अर्चना केली जाते तसेच सणाच्या दिवशी त्याच दगडाला तो व्यक्ती समजून नवीन पांढरे वस्त्रे परिधान केल्या जाते आणि त्याच्या आवडत्या वस्तू सुद्धा त्या ठिकाणी ठेवल्या जातात या जुन्या रूढी परंपरा असून आजही जोपासल्या जातात सर्व बाबींचा आढावा आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी जाणुन घेतला....