महाराष्ट्रातील धरणं आणि मोठे मध्यम लघु अशा दोन हजार नऊशे सत्त्याण्णव सिंचन प्रकल्पात अवघात तेहतीस पूर्णांक सदतीस टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. तापमानाचा पारा वाढतोय. एप्रिल पेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसतायत. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी आणखी लावली जातेय. विशेष म्हणजे टँकरचा आकडा देखील वाढतोय. राज्यातील एकोणीस जिल्ह्यातील सातशे अठ्ठावन्न गावं आणि दोन हजार दोनशे सत्तावन्न वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.