Farmers | प. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच! पाहा कुठे किती शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

 पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. एकट्या जानेवारी महिन्यामध्ये पश्चिम विदर्भातील ऐंशी शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलय शेतमालाला हमी भाव नाही कर्जबाजारीपणा विविध कारणांमध्ये होत असलेली पिळवणूक यामुळे जानेवारी महिन्यात पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात, ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक चौतीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती मिळाली आहे. मागील वर्षी पश्चिम विदर्भात तब्बल एक हजार एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तब्बल तीनशे चव्वेचाळीस आत्महत्या झाल्या होत्या.

संबंधित व्हिडीओ