मराठा आरक्षणाबाबत सरकार कायदेशीर तोडगा काढत असून, कोर्टात टिकेल असा निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. केवळ घोषणा करून प्रश्न सुटणार नाही. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन आझाद मैदानातच करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आंदोलनामुळे समाजाची बदनामी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.