मुंबईत आज काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. विधान भवना दुपारी 1.30 वाजता रमेश चेन्नीथला यांनी बैठक बोलवली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत त्याच पार्श्वभूमिवर चेन्नीथला यांनी मनसे संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. ठाकरेंच्या विजय सोहळा मेळाव्याला सुद्धा काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते.त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की आघाडी धर्मं पाळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.