भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून आठ मे रोजी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्करानं हा हल्ला निकामी केला पाकिस्ताननं अमृतसर मधील सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याची योजना आखलेली होती. परंतु भारतीय सैन्यानं सुवर्ण मंदिर आणि देशामधील इतर शहरांवर पाकिस्तानकडून केलेले हल्ले निकामी केले या शहरांच्या दिशेनं सोडलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन निकामी करण्यात आलेले आहेत.