राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं अखेर माघार घेतली.गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी, फोनाफोनी सुरू होती, अखेर आज काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेतलीय.सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.