लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आलाय.योजना जाहीर झाल्यानंतर तिजोरीवर 43 हजार कोटींचा भार आला आहे.त्यामुळे वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही, असंही यावेळी शिरसाट यांनी म्हंटलं आहे. दरम्यान अजित पवारांनी जनतेसमोर बोलण्याआधी आमच्याशी याबाबत बोलायला हवं होत असं म्हणत शिरसाटांनी खंत व्यक्त केलीय.