शक्तीपीठ महामार्गासाठी शासनाने 20 हजार 787 कोटी रुपयांची तरतूद केलीय, परभणीसह मराठवाड्यातील सहा जिल्हातुन शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून यात अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत, या संदर्भात आज परभणीच्या पोखर्णी गावा मधे बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.. एका गावातून एक प्रतिनिधी असं या बैठकी मधे शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे.. शासनाने शक्तीपीठ महामार्गासाठी 20 हजार कोटीची तरतूद केल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.