अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधातील लढा आणखी तीव्र होताना पाहायला मिळतोय.सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी जुलैमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.10 जुलै रोजी सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाच्या अभ्यास समितीच्या अहवालावरही या विरोधी नागरिकांची संशयास्पद भूमिका आहे.राज्य शासनाने या अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात कोणती ठोस भूमिका मांडलेली नाही.त्यामुळे आता या आंदोलनाची धार तीव्र होताना पाहायला मिळते.जाणून घेऊया याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.