Ahilyanagar| आठवीच्या मुलाने का केली दहावीच्या मुलाची हत्या? सीताराम सारडा शाळेतला प्रकार | NDTV

आठवीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केलीय.घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता आणि याच रागातून आठवीच्या विद्यार्थ्याने शाळेत मधल्या सुट्टीत चाकूने दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केलीय, अहिल्यानगरच्या सीताराम सारडा शाळेत हा सगळा प्रकार घडलाय.. बुधवारी शहरातील एका शाळेत दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आठवीतील विद्यार्थ्याने शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याच्या पोट व डोक्यावर चाकूने वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. त्याला शाळेतील शिक्षकांनी तातडीने दुचाकीवर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाला.

संबंधित व्हिडीओ