ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधवांचं व्हाट्स अॅप स्टेटस सध्या चर्चेत आहे.दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो. पण तो विझाल्यानंतर तेल घालून काही उपयोग नाही असा भास्कर जाधव यांचा स्टेटस आहे.भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअॅप स्स्टेटसचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे भास्कर जाधवांना मातोश्रीवर बोलवून त्यांची नाराजी दूर करणार का हे पाहावं लागेल.ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही भास्कर जाधवांनी बोलून दाखवलीय.तर भास्कर जाधव यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मन मोकळं करण्याचा सल्ला संजय राऊतांनी दिला.