यंदाच्या बजेटमधून काय मिळणार याकडे शेतकऱ्यांचंही लक्ष लागलंय. पीएस किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2019 मध्ये ही योजना सुरु झाली.. शेतकऱ्यांना सध्या एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने ही रक्कम दुप्पट करुन 12 हजार रुपये वार्षिक करण्याची शिफारस केली होती. तर नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार सरकारने शेतकऱ्यांना 3 हजार रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बिहारमधल्या शेतकऱ्यांना एकूण 9 हजार रुपये मिळतील. तेव्हा केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी हीच रक्कम लागू करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल. 3 हजार रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान-सहान गरजा पूर्ण करू शकतील.