आसाममध्ये अजूनही पूरस्थिती ओसरलेली नाही. गुवाहाटीच्या अनिलनगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिथं मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झालेत.पुरात अडकलेल्यांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून बचावकार्य राबवलं जातंय. बोटींच्या आधारे पूरग्रस्तांची सुटका केली जातेय. दरम्यान आसामच्या पुरामध्ये आतापर्यंत 89 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत...