मुंबईजवळील कर्जतमध्ये ‘हलाल टाउनशिप’ उभारणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. केवळ मुस्लिम समाजासाठी असलेल्या या टाउनशिपच्या नावाबद्दल आणि स्वरूपाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. धर्माच्या आधारावर निवासी वसाहती उभारणे हे जातीयतेला प्रोत्साहन देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या टाउनशिपला आरईआरए (RERA) ने मंजुरी कशी दिली, याबाबतही आयोगाने स्पष्टीकरण मागवले आहे.