मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची दाणादाण उडाली होती आणि त्यानंतर मुंबईच्या नालेसफाई बाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पहिल्याच पावसात नाले सफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची पोलखोल तर झालीच आहे पण नालेसफाई झाली मग मुंबई कशी काय तुंबली असाही प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर आणि विरोधक विचारतायेत.