काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताविरोधात पाकिस्तानी न्यूज चॅनल्स आणि यूट्यूब चॅनल्सवर भारतानं बॅन घातलाय.भारताविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणारी 16 पाकिस्तानी चॅनल्सवर बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयाकडून घेण्यात आलाय. पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि युट्यूब चॅनल्स सतत भारताविरोधात खोट्या आणि भंपक कथा रंगवतायत. काश्मीरबाबत भडकाऊ वक्तव्य केली जात आहेत.. आणि त्यामुळे भारतानं 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.