पंढरपूरच्या वारीचा शेवटचा टप्पा असणारा वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या टप्प्याचं काम रखडलंय. आषाढी वारीपूर्वी पालखी मार्गाचं काम पूर्ण होऊ शकणार नसल्याची असमर्थता प्रशासनाकडून दिसून येते आहे. अशा परिस्थितीमध्ये यंदा पंढरपूरच्या वाटेवरती प्रमुख संतांच्या पालख्यासोबतच वारकरी भक्तांचा प्रवास मात्र खडतर असणार आहे.